पुण्याच्या अनुज बिडवे या युवकाच्या लंडनमध्ये २६ डिसेंबर २०११ मध्ये झालेल्या हत्येमुळे आपण सर्वजण हळहळलो. आणि त्याहि पेक्षा आश्चर्यचकित झालो, जेव्हा ह्या हत्येचा निकाल २७ जुलै २०१२ मध्ये लागला. केवळ ७ महिन्यांच्या कालावधी मध्ये गंभीर गुन्ह्याची दखल घेतली असे आपल्याकडे का घडत नाही? आरोपपत्र दाखल करण्याच्या कालावधीचे नियम, निकालाची चालढकल, प्रदिर्घ उलटतपासणी आणि तत्सम कायद्यातील त्रुटि कधी सुधारल्या जातील? न्य़ाय देताना होणारी दिरंगाई रोखण्यासाठी अत्यंत कडक उपाययोजना होणे गरजेचे आहे. तसेच न्यायप्रक्रियेतील संबंधीतांमध्ये असलेला शिस्तीचा अभाव हे ही एक कारण आहे. त्यासाठी सर्व संबंधीत घटकांच्या मानसिकतेत बदल अपेक्षीत आहे.
महाराष्ट्र टाईम्स २४.०८.२०१२